
वर्णन : या योजनेअंतर्गत बहुवार्षिक फळबागांच्या लागवडीसाठी अर्धसहाय्य अनुज्ञेय राहील. या योजनेतून पिके आणि पशुधन यांच्यासह फळबागांच्या रूपात शेतकऱ्यांना उत्पन्नाचे टिकाऊ स्त्रोत उपलब्ध करुन देणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे व दुप्पट होण्यास मदत करणे हे या योजनेचे उद्दीष्ट आहे. मनरेगा फळबाग लागवड योजनेतून वगळलेले लोक या योजनेत समाविष्ट आहेत.पात्रता : 1. अर्जदार शेतकरी असला पाहिजे. 2. कमीतकमी 0.2 एकर जमीन आणि जास्तीत जास्त 15 एकर जमीन असावी. 3. निवासस्थान राज्य = महाराष्ट्र 4. मनरेगा योजनेंतर्गत पात्र शेतकरी मनरेगा योजनेचा लाभ घेतल्यानंतर उरलेल्या भागासाठी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.प्रक्रिया : 1. विभागाकडून जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. 2. इच्छुक शेतक्यांना लेखी अर्जाद्वारे जाहिरातीच्या तारखेपासून 21 दिवसांच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे 3. विभाग अर्जांचे पुनरावलोकन करेल आणि लॉटरी पद्धतीने लाभार्थींची निवड करेल. 4. निवडलेल्या लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे 2 दिवसात सादर करावी लागतील. 5 .त्यानंतर लाभार्थ्यांना शासकीय रोपवाटिकेतून रोपे निवडण्याचा परवाना देण्यात येईल.लाभ : रु.1,10,000 पर्यंत फळबाग लागवडीसाठी अर्थसहाय्य